वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा २०२५
‘विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे’ या मराठी विज्ञान परिषदेच्या मूळ उद्देशाला अनुसरून १९६७ सालापासून विज्ञान निबंध स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी १९८७ सालापासून विद्यार्थी गट (इयत्ता बारावी पर्यंत) आणि खुला गट (पदवीचे विद्यार्थी व इतर सर्व प्रोढ) असे दोन गट करण्यात आले. आलेल्या निबंधांचे परीक्षण आधी भौगोलिक विभागीय पातळीवर तर नंतर राज्यपातळीवर केले जाते. या वर्षी विद्यार्थी गटासाठी मोबाइलपासून मैदानाकडे तर खुल्या गटासाठी देहदान व अवयवदान असे विषय ठरवण्यात आले आहेत. अधिक तपशील सोबतच्या पत्रकात दिला आहे. […]